मंगळवार, २९ नोव्हेंबर, २०१६

बाबासाहेबांच्या वाटेनं

"बाबासाहेबांच्या वाटेनं"
दैववादी बापाने पोराला शिव्या देत म्हणावं,
"आयघाल्या.. धुळ खात पडलेल्या फोटोला
कधी साफ करत नाहीस
कधी हार घालत नाहीस....
काय तोंडवर करून
बाबासाहेब सांगतो रे?"...
दैववादी मायनं पोराला समजावत म्हणावं,
"बाळा तु तुझं कर,मी माझं करते...
तु बुद्धाला मान मी देवाला पुजते...
तुला नाही जमत तर थट्टा तरी नको करूस,
असत्यात रे देव त्यांचा तिरस्कार नको करूस.
दैववादी,"सु"शिक्षीत बहीण भावाने भावाला टोमणं देत म्हणावं,
कसला रे समाज तुझा?
अन कसली तुझी चळवळ?..
नेत्यांसोबत नुसती तुमची,
आप्पलपोटी वळवळ..!
ते पोरगं बिचारं घेतं ऐकुन,
चाळतं बँग..
काढतं पुस्तक बसतं वाचत....
अन मग कळतं त्याला,
बापाला बाबासाहेब मुर्ती अन फोटोपुरताच माहीतीये....
अन मग कळतं त्याला,
मायला बाबासाहेब
नवऱ्याला कळतो तेवढाच माहीतीये...
अन मग कळतं त्याला,
भाऊबहीणीला बाबासाहेब
मायबापाला कळतो तेवढाच माहीतीये...
हसतो मोठमोठ्याने अन म्हणतो.....
"च्यायची येड्यांची जत्रा ही..
चालुद्या तुमचं रहाटगाडगं"..
मी चालणार बुद्धाच्या विचारांवर
हे जीवंत असुन मेलेत,
देव कोपायच्या भीतीनं..!
माझ्या पुढच्या पीढीला नेईन मी,
बाबासाहेबांच्याच वाटेनं...!
सचिन डांगळे...!

मला फक्त बुद्ध साकाराचा नाहीये...तर बाबासाहेबांच्या विचारांतील बुद्ध साकारायचा आहे.

मला फक्त बुद्ध साकाराचा नाहीये...तर बाबासाहेबांच्या विचारांतील बुद्ध साकारायचा आहे.

प्रत्येक देशातील बुद्ध आणि बुद्धांना अनुसरण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत...मग चीन असो, जपान असो किंवा थाईलैंड .....प्रत्येक देशात बुद्धांच्या मुर्त्यांपासून ते त्यांच्या आचरणापर्यंत प्रत्येक गोष्टीत विविधता आढळते....
बुद्धांचा जन्म भारतातला....परंतू मनुवाद्यांच्या कट- कारस्थानामुळे त्यांचे विचार व त्यांनी निर्मिलेला बौद्ध धम्म भारतातून नष्ट झाला होता...बाबासाहेबांनी १९५६ साली धर्मांतर करून भारत बौद्धमय करण्याचे पहीले पाऊल  उचलले. पण त्या आधी त्यांनी प्रत्येक धर्माचा सखोल अभ्यास केला. त्यातून त्यांना बौद्ध धम्म हा मानवतावादी आणि स्वतंत्र, समता, बंधूता पसरविणारा विज्ञानावर आधारित असलेला असा धम्म वाटला . म्हणून त्यांनी या धम्माचा स्वीकार केला....पण त्रिपिटक आणि धम्मपद असे बौद्ध धर्मग्रंथ असताना बाबासाहेबांना बुद्ध आणि त्यांचा धम्म हे पुस्तक का लिहावेसे वाटले????? तसेच पंचशील आणि अष्टांग मार्ग असताना बाबासाहेबांना धर्मांतराच्या वेळी२२ प्रतिज्ञा देण्याची गरज का भासली????
तर त्याला कारणही तसेच आहे...भारताची एकंदर परिस्थिति, त्यातील रुढी परंपरा, जातीव्यस्था व लोकांची इतर जातीतील लोकांशी वागण्याची पद्धति या सर्वांचा विचार करून तसेच भविष्यात हा धर्म अधिक लवचिक व अधिक विज्ञानवादी कसा बनेल या सर्व गोष्टींचा विचार करूनच बाबासाहेबांनी २२ प्रतिज्ञांची निर्मिती केली....
बाबासाहेबांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञा या प्रत्येक व्यक्तीस माणूस म्हणून जगण्यास पुरक अश्या ठरतात...या २२ प्रतिज्ञा अंगीकारल्या असता ती व्यक्ती भविष्यात कोणत्याच परिस्थितीत डगमगणार नाही हे मात्र खरे.
तेव्हा ज्या बाबासाहेबांनी आम्हा नवा जन्म दिला त्या बाबासाहेबांच्या विचारांतील बुद्ध आणि बौद्ध धम्म साकारणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे असे मला वाटते. बाकी भिमसैनिक तर सुज्ञान आहेतच.

जय भिमच

सुचिता कांबळे
( २२ प्रतिज्ञा अभियान प्रचारक )

भीमानं लिहून संविधान

गुलामगिरीच्या तोडून बेडया घडविला देश महान..
भिमान लिहून संविधान...!
भिमान लिहून संविधान..!

अस्पृश्य होते कोटी कोटी...
मिळे ना पाणी ना ती रोटी...
माणूस म्हणुनी जगतोय आज...
त्याने...दिले ते हक्क समान....
भिमान लिहून संविधान...
भिमान लिहून संविधान...!

देशासाठी झटझट झटला...
देशाने पण जातीत पूजला....
मिरवी देश हा होण्या महा..सत्ताक...
आहे का कोणा जान...
भिमान लिहून संविधान...
भिमान लिहून संविधान..!

प्रसाद गातो..
प्रसाद लिहितो..
आज हां थाटामध्ये ही जगतो...
सांगा...कोणामुळे.... सर्व मिळे मान...

भिमान लिहून संविधान....
भिमान लिहून संविधान...!
      -प्रसाद देठे. (9768674830)
जय भीम । जय भारत ।

#Constitution_Day

#Thanks_Babasaheb_Ambedkar

संविधान

संविधान दिनाच्या मंगलमय सदिच्छा

बा भीमाने...

आम्ही भारताचे लोकं
आहे अभिमान...
बा भीमाने दिले,
आम्हा संविधान.

सार्वभौम, समाजवादी,
धर्मनिरपेक्षता...
राजनैतिक, सामाजिक,
आर्थिक, न्याय व्यवस्था
या मूल्यांची करुन दिली
आम्हा सगळ्यांना जाण
बा भीमाने...

आहे समता, बंधूता,
स्वातंत्र्य या भारता,
टिकवली ज्यांनी ही,
राष्ट्राची एकात्मता
हक्कासाठी लढले आहे
आमचे प्रेरणास्थान
बा भीमाने...

अरे झोपू नका सगळे
वाचा संविधान,
आचरणात घ्या रे...
जागवा स्वाभिमान,
पुन्हा नाही येणार आता
भीमासारखा महान...
बा भीमाने....

-प्रमोद पवार

शुक्रवार, २५ नोव्हेंबर, २०१६

मला हवी असलेली माणसं

पेटवीण्या निघालो समतेचा दिवा
तो दिवा आहे पण त्याची वात नाही !

करावे वाटले सारी रात्र प्रकाशमय
येथे अंधार आहे पण रात्र नाही !

हाय हॅलो करणारे पुष्कळ भेटले
खऱ्या जिवलग मित्रासारखी साथ नाही !

माळावरच्या म्हाताऱ्याची शोधतो निवांत झोपड़ी
कारण, गर्दीतल्या बंगल्यात ती बात नाही !

जाळाव्या  वाटतात त्या फाइवस्टार हॉटेल्स
ज्यात मडक्यात शिजलेला  वरण भात नाही !

जाम खाल्ल्या गॅसवरच्या पाणचट   चपात्या
तिला मायेचा हात अन् चुलीतली राख नाही !

हिरव्यागार झाडाखाली शोधतो गारगार वारा
ज्याला कृत्रिम एसीची साथ नाही !

ते लहानपणच जगावं वाटतं पुन्हा आज
जिथे प्रेमच प्रेम पण प्रेमाच्या नावावर घात नाही !

पूर्वीचेच आपले गाव मस्त होते मित्रा
जिथे फुटकी घरे पण भावकित वाद नाही !

काय जाळावे का या पैशाने माजलेल्या गावाला
जिथे द्वेषच द्वेष पण चुलत्या काकांची प्रेमाची दाद नाही !

*संजय बनसोडे -9819444028*

तुझ्या पाऊलखुणा पुसल्या त्या वैऱ्यांनी

लुटले तुझ्या समाजा, अहिऱ्या गहिऱ्यानी
तुझ्या पाऊलखुणा, पुसल्या त्या वैऱ्यानी !!

झोंबला असा त्या विंचवाचा डंक
धावती सैरावैरा तुझे ते रंक !
तुटली फांदी झाले घायाळ पाखरू
दिशाहीन झाले ते भीम लेकरू !

जोर धरला त्या विषमतेच्या वाऱ्यानी
तुझ्या पाऊलखुणा पुसल्या त्या वैऱ्यानी !!

त्या अहिऱ्या गहिऱ्याच्या हे नांदी लागलं
भाव भावकीला सख्या, वैऱ्यागत वागलं !
ना दिसे एकीचे बळ ना दिसे चळवळ
शेंबडे झाले पुढारी करती नुसती वळवळ !

सांगे संजय ठेचा वैरी,मिळून साऱ्यानी
तुझ्या पाऊलखुणा,पुसल्या त्या वैऱ्यानी !!

संजय बनसोडे 9819444028

तुझ्यात नाही भीमाचे गुणं

होऊन मवाली जोहार घाली
वाजवी वैऱ्याचं तुणतुणं
सत्ताधाऱ्याचं धूतो धूनं
तुझ्यात नाही भीमाचे गुणं !!

खातो कुणाचं गातो कुणाचं
तुलाच हाय का ठावं
मागे तु सरला कसा विसरला
मनुवादी तो घावं !

कसे फेडसी या जन्मी तु
बाबासाहेबांचे ते ऋणं
सत्ताधाऱ्याचं धूतो धूनं
तुझ्यात नाही भीमाचे गुणं !!

नको हुजरेगीरी ती मुजरेगीरी
नको गुलामीत त्या बद्ध
अनुसरून भीमाला शरण बुद्धाला
जाऊन हो तु शुद्ध !

लिहतो संजय तुझ्याच साठी
पाहून गुलामीचं हे जीनं
सत्ताधाऱ्याचं धूतो धूनं
तुझ्यात नाही भीमाचे गुणं !!

संजय बनसोडे 981944028

शातिर औलाद

*शातिर औलाद*

इंग्रजी विचाराने गर्भधारण झालेली
व सनातनी विचारप्रवाहात
बाळंत झालेली
ही शातिर औलाद.
जन्मतःच रक्त पिपासू बनून
चिटकली आमच्या अंगा खांद्याला.
आम्हीही तिला धिक्कारलं नाही
वाढू दिलं आमच्या अंगा खांद्यावर.
त्यांच्या नाजायज बापाने
आणल्या
परदेशातून लाखो कंपन्या
तिथेही त्यांनी आम्हांला शूद्रच घोषित केले,
आणि नाव ठेवले
सफाई कामगार, शिपाई, वाचमॅन, वर्कर
आणि ते बनले
MD, VP,GM
त्यांची पान्हावलेली माय
आजही हंबरडा फोडते
पण ते आमचे रक्त पिण्यातच मग्न आहेत.

संजय बनसोडे

झाली झांजर ....

फुटला आकाशी तांबडा पाझरं
झाली झांजरं झांजरं झांजरं !!

खोप्यात पाखरू, घेई खुशीत लेकरू
गोठ्यात वासरु, दूध पिये चुरूचूरू !

गाय चाटती खुशीमंधी वासरं
झाली झांजरं झांजरं झांजरं !!

ठोकली आरोळी, बाग दिली कोंबड्यानं
धुडगूस घातला त्या, कळपात मेंढरानं !

डोळं चोळीत उठलं पोरं साजरं
झाली झांजरं झांजरं झांजरं !!

लाडी गोडी करी सखा,मैना चोरीते अंग
दाने टिपण्या पिल्ले, फिरती कोंबडी संग !

भरती नळावर कुणी त्या घागरं
झाली झांजरं झांजरं झांजरं !!

संजय बनसोडे 9819444028

वादळवारा.....

सूर्यही नव्हता चंद्रही नव्हता
नव्हता तो रं तारा
वादळवारा ..........
वादळवारा सुसाटणारा
भीम ज्वालामुखी अंगारा !!

बघून धरणी थरथर कापे
लाव्हाचा हुंकारं
ऐकून वाणी आकाश फाटे
अशी ती भीम ललकारं
पाण्यालाही आग लावली
होता ज्वलंत तो निखारा
वादळवारा ...................!!

वीज होऊनी क्षणात करी
दुश्मनावरी वार
दिन दलितांसाठी तो लढला
करुन पेनाला तलवार
दिन दुबळ्यांचा झाला दाता
दिला तयांना थारा
वादळवारा ....................!!

मनुवादाला मातीत गाड़णारा
होता मर्दानी तो नर
नतमस्तक होऊन भीमचरणी
झुकती संजयाचे कर
अभिमानाने सन्मानाने
देती जय भीम सारे नारा
वादळवारा .................
वादळवारा सुसाटणारा
भीम ज्वालामुखी अंगारा !!

संजय बनसोडे

तुझ्या नरकातल्या यातना मी जिवंतपणीच भोगल्या

भर चौकात नागडं करतय
नशीब नावाचा  वैरी

मेलेल्या ढोराप्रमाणे,
रोजच काढतय  सालपट
भूक नावाची सूरी

तोडतात लचके देहाचे चिकन तंदूरीगत
वासनाधीन कुत्री

स्वप्न तळल्या जातात भज्याप्रमाणे
वासनेच्या कढ़ाईत

तु काय भीती दाखवतो  रे सुकाळीच्या,
मला त्या नरकाची

तुझ्या त्या नरकातल्या यातना
मी जिवंतपणीच भोगल्यात

संजय बनसोडे

बा भीमा.......

तूच दिला थारा तूच दिला चारा सोसाट्याचा मारा परि तुझाच सहारा ॥ जातिवाद दाट होता लई बाट अंधाराची वाट परि मुखी तुझा नारा ॥ तुझच हे देणं...