मंगळवार, २९ नोव्हेंबर, २०१६

मला फक्त बुद्ध साकाराचा नाहीये...तर बाबासाहेबांच्या विचारांतील बुद्ध साकारायचा आहे.

मला फक्त बुद्ध साकाराचा नाहीये...तर बाबासाहेबांच्या विचारांतील बुद्ध साकारायचा आहे.

प्रत्येक देशातील बुद्ध आणि बुद्धांना अनुसरण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत...मग चीन असो, जपान असो किंवा थाईलैंड .....प्रत्येक देशात बुद्धांच्या मुर्त्यांपासून ते त्यांच्या आचरणापर्यंत प्रत्येक गोष्टीत विविधता आढळते....
बुद्धांचा जन्म भारतातला....परंतू मनुवाद्यांच्या कट- कारस्थानामुळे त्यांचे विचार व त्यांनी निर्मिलेला बौद्ध धम्म भारतातून नष्ट झाला होता...बाबासाहेबांनी १९५६ साली धर्मांतर करून भारत बौद्धमय करण्याचे पहीले पाऊल  उचलले. पण त्या आधी त्यांनी प्रत्येक धर्माचा सखोल अभ्यास केला. त्यातून त्यांना बौद्ध धम्म हा मानवतावादी आणि स्वतंत्र, समता, बंधूता पसरविणारा विज्ञानावर आधारित असलेला असा धम्म वाटला . म्हणून त्यांनी या धम्माचा स्वीकार केला....पण त्रिपिटक आणि धम्मपद असे बौद्ध धर्मग्रंथ असताना बाबासाहेबांना बुद्ध आणि त्यांचा धम्म हे पुस्तक का लिहावेसे वाटले????? तसेच पंचशील आणि अष्टांग मार्ग असताना बाबासाहेबांना धर्मांतराच्या वेळी२२ प्रतिज्ञा देण्याची गरज का भासली????
तर त्याला कारणही तसेच आहे...भारताची एकंदर परिस्थिति, त्यातील रुढी परंपरा, जातीव्यस्था व लोकांची इतर जातीतील लोकांशी वागण्याची पद्धति या सर्वांचा विचार करून तसेच भविष्यात हा धर्म अधिक लवचिक व अधिक विज्ञानवादी कसा बनेल या सर्व गोष्टींचा विचार करूनच बाबासाहेबांनी २२ प्रतिज्ञांची निर्मिती केली....
बाबासाहेबांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञा या प्रत्येक व्यक्तीस माणूस म्हणून जगण्यास पुरक अश्या ठरतात...या २२ प्रतिज्ञा अंगीकारल्या असता ती व्यक्ती भविष्यात कोणत्याच परिस्थितीत डगमगणार नाही हे मात्र खरे.
तेव्हा ज्या बाबासाहेबांनी आम्हा नवा जन्म दिला त्या बाबासाहेबांच्या विचारांतील बुद्ध आणि बौद्ध धम्म साकारणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे असे मला वाटते. बाकी भिमसैनिक तर सुज्ञान आहेतच.

जय भिमच

सुचिता कांबळे
( २२ प्रतिज्ञा अभियान प्रचारक )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

बा भीमा.......

तूच दिला थारा तूच दिला चारा सोसाट्याचा मारा परि तुझाच सहारा ॥ जातिवाद दाट होता लई बाट अंधाराची वाट परि मुखी तुझा नारा ॥ तुझच हे देणं...