शुक्रवार, २५ नोव्हेंबर, २०१६

मला हवी असलेली माणसं

पेटवीण्या निघालो समतेचा दिवा
तो दिवा आहे पण त्याची वात नाही !

करावे वाटले सारी रात्र प्रकाशमय
येथे अंधार आहे पण रात्र नाही !

हाय हॅलो करणारे पुष्कळ भेटले
खऱ्या जिवलग मित्रासारखी साथ नाही !

माळावरच्या म्हाताऱ्याची शोधतो निवांत झोपड़ी
कारण, गर्दीतल्या बंगल्यात ती बात नाही !

जाळाव्या  वाटतात त्या फाइवस्टार हॉटेल्स
ज्यात मडक्यात शिजलेला  वरण भात नाही !

जाम खाल्ल्या गॅसवरच्या पाणचट   चपात्या
तिला मायेचा हात अन् चुलीतली राख नाही !

हिरव्यागार झाडाखाली शोधतो गारगार वारा
ज्याला कृत्रिम एसीची साथ नाही !

ते लहानपणच जगावं वाटतं पुन्हा आज
जिथे प्रेमच प्रेम पण प्रेमाच्या नावावर घात नाही !

पूर्वीचेच आपले गाव मस्त होते मित्रा
जिथे फुटकी घरे पण भावकित वाद नाही !

काय जाळावे का या पैशाने माजलेल्या गावाला
जिथे द्वेषच द्वेष पण चुलत्या काकांची प्रेमाची दाद नाही !

*संजय बनसोडे -9819444028*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

बा भीमा.......

तूच दिला थारा तूच दिला चारा सोसाट्याचा मारा परि तुझाच सहारा ॥ जातिवाद दाट होता लई बाट अंधाराची वाट परि मुखी तुझा नारा ॥ तुझच हे देणं...