पूर्वीपासुनच या देशात दोन विचारधारा चालत आल्या आहेत.एक आहे देवाचे अस्तित्व मानणारी आणि दूसरी आहे देवाच्या अस्तित्व न मानणारी. साहजिकच देवाचे अस्तित्व मानणाऱ्यांचा पाया हजारो वर्षापासून भक्कम आहे...तर देवाचे अस्तित्व न मानणारी नास्तिक विचारधारा आजपर्यंत या सनातनी पूराच्या प्रवाहात शाबूत ठेवण्याचे काम त्या त्या काळातल्या महापुरुषाने केले आहे.चार्वाक, बुद्ध , व्हाया फुले आंबेडकरांमार्फत ही विचारधारा इथपर्यंत आली आहे..देव आला की कर्मकांड आले. अंधश्रद्धा आली..धर्म,जात,पंत आला आणि त्या सोबत धर्म कट्टरता आली.दुसऱ्या धर्माच्या देवांविरुद्ध द्वेष आला.
पूर्वी कधी नाही तितकी वैचारिक सुधारणा आपल्या महाराष्ट्रात या नऊ दहा वर्षात झाली आहे.आणि ही सुधारणा फक्त एकाच धर्मात किंवा एकाच जातीपुरती मर्यादित नव्हती..आज मुस्लिम समाजही आपल्या धर्मातील अनिष्ट रुढी विषयी आवाज उठवताना दिसत आहे..हिंदू, बौद्ध धर्मातही हे बदलाचे वारे तीव्र गतीने वाहताना दिसत आहे..हिंदू धर्मातून विवेकी पद्धतीने अंधश्रद्धा दूर करून समाजाला डोळस करण्याचे काम "अंधश्रद्धा निर्मुलन समिती" सारख्या संघटनेने केले आहे. तर हजारोवर्षापासून गरीब, शेतकऱ्यांना लुटून एका विशिष्ट समाजाचे वर्चस्व असणाऱ्या ब्राह्मणी पूजापाठ पासून समाजाला डोळस करण्याचे काम "संभाजी ब्रिगेट" सारख्या संघटनेनी केले आहे..
आज हिंदू समाजातही ज्यांनी रुढी परंपरा नाकारुन पुरोगामीत्व स्वीकारले असे आपल्या घरात गणपती बसवत नाहीत गुढी पाडवा साजरा करत नाहीत. पण बौद्ध समाजात एक दोघांनी गणपती बसवला व बौद्ध तरुणांनी त्यांना तिथे जावून खडसावले आणि महाराष्ट्रभर उलट सुलट चर्चेचा ऊत आला....
जगताप कुटुंबीय म्हणाले की आम्ही नवस बोललो होतो व तो पूर्ण झाला म्हणून आम्ही गणपती बसवला. जगताप कुटुंबीयांच्या डोक्यात जी ढासुन अंधश्रद्धा भरली ती याला कारणीभूत आहे.त्यांचा नवस पूर्ण झाला म्हणून ते कृत्य त्यांनी केले. त्याला खऱ्या प्रबोधनाची गरज आहे. नवस वैगेरे हे फक्त थोतांड आहे. बाबासाहेब आणि बुद्धाच्या विचाराचे दाखले देऊन समाज बांधवानी त्याचे प्रबोधन करायला हवे पण तसे न करता त्याच्या घरचा वीडियो सोशियल मीडियावर वायरल करून जगताप कुटुंबीयाची बदनामी करण्याचे काम केले व काही न्यूज़ पेपरने त्याला गद्दार घोषित करून त्याच्या मोबाईल नंबर सहित त्यांच्या कारनाम्याची बातमी फ्रंट पेजला छापली.
एका बाजूला हे सर्व होत असताना दुसऱ्या बाजूला हिंदू समाजाचा प्रिय असलेला गणपती बसवला म्हणून बौद्ध समाज आपल्याच समाज बांधवाना गद्दार घोषित करून त्यांच्यावर बहिष्कार टाकण्याच्या गोष्टी करीत आहे त्यामुळे विरोधकाच्या हाती आयतेच कोलीत आले व, मानवतावाद व समता सांगणाऱ्या बौद्ध धम्मात बौद्ध तालिबानी बनत आहेत. असा त्यांनी समाचार घेतला...आज सोशियल मीडियावर एक अशी फळी निर्माण झाली आहे त्यात फक्त बौद्धच नाही तर हिंदू समाज बांधवही भरपूर आहेत ज्यांनी पुरोगामी विचारधारेचा स्वीकार केला ते आज हिंदू धर्माच्या अनिष्ट रुढी परंपरेवर टीका करतात.गणपती का बसवू नये हे पूर्वीच्या विचारवंताचे दाखले देऊन सांगतात....बुद्धाच्या आणि बाबासाहेबांच्या विचारांना फाटा देत जगताप कुटुंबीयांनी मुद्दामहून गणपती बसवला नाही तर त्यांचे प्रबोधन न झाल्याने अंधश्रद्धा कारणीभूत ठरली. समाजप्रबोधन हे चार भिंतीच्या आत व्हायला पाहीजे.जे बाबासाहेब जातीअंतासाठी लढले, त्यांचेच नाव घेऊन जर आपण जातिवाद पसरवत असाल तर नक्कीच इतर धर्मीयांचा बाबासाहेब आणि बौद्ध धम्माकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल. स्वतच्या देवांवर व संस्कृती वर जर इतर धर्मीय टीका, टिप्पणी करीत असेल तर भावना दुखावल्या जाणारच. जेंव्हा आपण ह्या सर्वे पोस्ट (भाऊ कदम,जगताप कुटुंबीय,हिंगोलीचे शिक्षक) सोशियल मीडियावर वायरल करीत होतो तेंव्हा हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्या हे साहजिकच आहे...समोरच्याला विचारांनी पराजित करावे हीच आंबेडकरी शिकवण आहे आणि ती आपण जोपासलीच पाहीजे.
आंबेडकरी विचारधारा आत्मसात करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस इतर धर्मात झपाट्याने वाढत आहे आणि अश्यात आपण बाबासाहेब आंबेडकर यांना एकाच जातीत बांधण्याचा प्रयत्न कराल तर भारत बौद्धमय करण्याचे बाबासाहेबांचे स्वप्न फोल ठरेल..आंबेडकरी विचारधारा आज सर्वच समाज स्वीकारतांना दिसत आहे. कुणाच्या भावना दुखवून समाजप्रबोधन होत नाही. समाजप्रबोधन हे इंजेक्शना प्रमाणे झाले पाहीजे. समोरच्याला वेदनाही जाणवल्या नाही पाहीजे आणि त्याचा रोगही बरा झाला पाहीजे.....
पूर्वी कधी नाही तितकी वैचारिक सुधारणा आपल्या महाराष्ट्रात या नऊ दहा वर्षात झाली आहे.आणि ही सुधारणा फक्त एकाच धर्मात किंवा एकाच जातीपुरती मर्यादित नव्हती..आज मुस्लिम समाजही आपल्या धर्मातील अनिष्ट रुढी विषयी आवाज उठवताना दिसत आहे..हिंदू, बौद्ध धर्मातही हे बदलाचे वारे तीव्र गतीने वाहताना दिसत आहे..हिंदू धर्मातून विवेकी पद्धतीने अंधश्रद्धा दूर करून समाजाला डोळस करण्याचे काम "अंधश्रद्धा निर्मुलन समिती" सारख्या संघटनेने केले आहे. तर हजारोवर्षापासून गरीब, शेतकऱ्यांना लुटून एका विशिष्ट समाजाचे वर्चस्व असणाऱ्या ब्राह्मणी पूजापाठ पासून समाजाला डोळस करण्याचे काम "संभाजी ब्रिगेट" सारख्या संघटनेनी केले आहे..
आज हिंदू समाजातही ज्यांनी रुढी परंपरा नाकारुन पुरोगामीत्व स्वीकारले असे आपल्या घरात गणपती बसवत नाहीत गुढी पाडवा साजरा करत नाहीत. पण बौद्ध समाजात एक दोघांनी गणपती बसवला व बौद्ध तरुणांनी त्यांना तिथे जावून खडसावले आणि महाराष्ट्रभर उलट सुलट चर्चेचा ऊत आला....
जगताप कुटुंबीय म्हणाले की आम्ही नवस बोललो होतो व तो पूर्ण झाला म्हणून आम्ही गणपती बसवला. जगताप कुटुंबीयांच्या डोक्यात जी ढासुन अंधश्रद्धा भरली ती याला कारणीभूत आहे.त्यांचा नवस पूर्ण झाला म्हणून ते कृत्य त्यांनी केले. त्याला खऱ्या प्रबोधनाची गरज आहे. नवस वैगेरे हे फक्त थोतांड आहे. बाबासाहेब आणि बुद्धाच्या विचाराचे दाखले देऊन समाज बांधवानी त्याचे प्रबोधन करायला हवे पण तसे न करता त्याच्या घरचा वीडियो सोशियल मीडियावर वायरल करून जगताप कुटुंबीयाची बदनामी करण्याचे काम केले व काही न्यूज़ पेपरने त्याला गद्दार घोषित करून त्याच्या मोबाईल नंबर सहित त्यांच्या कारनाम्याची बातमी फ्रंट पेजला छापली.
एका बाजूला हे सर्व होत असताना दुसऱ्या बाजूला हिंदू समाजाचा प्रिय असलेला गणपती बसवला म्हणून बौद्ध समाज आपल्याच समाज बांधवाना गद्दार घोषित करून त्यांच्यावर बहिष्कार टाकण्याच्या गोष्टी करीत आहे त्यामुळे विरोधकाच्या हाती आयतेच कोलीत आले व, मानवतावाद व समता सांगणाऱ्या बौद्ध धम्मात बौद्ध तालिबानी बनत आहेत. असा त्यांनी समाचार घेतला...आज सोशियल मीडियावर एक अशी फळी निर्माण झाली आहे त्यात फक्त बौद्धच नाही तर हिंदू समाज बांधवही भरपूर आहेत ज्यांनी पुरोगामी विचारधारेचा स्वीकार केला ते आज हिंदू धर्माच्या अनिष्ट रुढी परंपरेवर टीका करतात.गणपती का बसवू नये हे पूर्वीच्या विचारवंताचे दाखले देऊन सांगतात....बुद्धाच्या आणि बाबासाहेबांच्या विचारांना फाटा देत जगताप कुटुंबीयांनी मुद्दामहून गणपती बसवला नाही तर त्यांचे प्रबोधन न झाल्याने अंधश्रद्धा कारणीभूत ठरली. समाजप्रबोधन हे चार भिंतीच्या आत व्हायला पाहीजे.जे बाबासाहेब जातीअंतासाठी लढले, त्यांचेच नाव घेऊन जर आपण जातिवाद पसरवत असाल तर नक्कीच इतर धर्मीयांचा बाबासाहेब आणि बौद्ध धम्माकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल. स्वतच्या देवांवर व संस्कृती वर जर इतर धर्मीय टीका, टिप्पणी करीत असेल तर भावना दुखावल्या जाणारच. जेंव्हा आपण ह्या सर्वे पोस्ट (भाऊ कदम,जगताप कुटुंबीय,हिंगोलीचे शिक्षक) सोशियल मीडियावर वायरल करीत होतो तेंव्हा हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्या हे साहजिकच आहे...समोरच्याला विचारांनी पराजित करावे हीच आंबेडकरी शिकवण आहे आणि ती आपण जोपासलीच पाहीजे.
आंबेडकरी विचारधारा आत्मसात करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस इतर धर्मात झपाट्याने वाढत आहे आणि अश्यात आपण बाबासाहेब आंबेडकर यांना एकाच जातीत बांधण्याचा प्रयत्न कराल तर भारत बौद्धमय करण्याचे बाबासाहेबांचे स्वप्न फोल ठरेल..आंबेडकरी विचारधारा आज सर्वच समाज स्वीकारतांना दिसत आहे. कुणाच्या भावना दुखवून समाजप्रबोधन होत नाही. समाजप्रबोधन हे इंजेक्शना प्रमाणे झाले पाहीजे. समोरच्याला वेदनाही जाणवल्या नाही पाहीजे आणि त्याचा रोगही बरा झाला पाहीजे.....
मनोगत................
संजय एल बनसोडे
संजय एल बनसोडे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा