दही हंडीच्या गोविंदा पथकात आपलेही मुले पुष्कळ असतात.
मुम्बईत गावागावातून आलेल्या लोकांनी आपला समाज बघून घरे घेतली नाही तर आपआपल्या ऐपतीप्रमाणे घरे घेऊन स्थायिक झाले.
माझ्या घराशेजारी ब्राह्मण आहे बाजूला आगरी आहे असे अनेक जातीधर्माची व्यक्ती आपल्याला एकाच विभागात बघायला मिळतात त्यांच्यात सख्या भावाप्रमाणे प्रेम असते.
माणूस म्हणून कुणी दुसऱ्या व्यक्तीजवळ जातो त्याला माणूस म्हणूनच तो मदत करतो.तेंव्हा तो त्याला त्याची जात धर्म विचारीत नाही.मुम्बईत सर्व जाती धर्मांचे माणसे एकत्र येऊन सर्व उत्सव आनंदाने साजरे करतात.
दही हंडीत आपले मुले भाग घेतात त्याला हेच एक कारण आहे.तुम्हांला गावात हे चित्र बघायला मिळणार नाही.
हिंदू मित्रासोबत त्यांच्या सणात भाग घेणे वेगळे पण, जर कुणी आपल्या समजातील व्यक्ती बाबासाहेबांच्या नावावर आणि बौद्ध धम्माच्या नावावर जर हिंदू सण साजरे करीत असेल तर त्याला विरोध करावाच लागेल.नाहीतर हिंदू धर्मग्रंथात सांगितल्या प्रमाणे बुद्ध हा विष्णूचा अवतार बनूनच राहील.
संजय बनसोडे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा