माझ्या लेखाची व कवितेची योग्य समीक्षा न करता काही जातिवादी, जळाऊ वृत्तीचे लोकं व्यर्थ बडबड करतात.
अशा व्यर्थ टीकाकारासाठी त्यांना लागू होणारा संत तुकाराम महाराजांचा अभंग पहा,
जेवताही धरी / नाक हागतिये परी //
ऐसी याचा करी चाळा / आपुलीच अवकळा //
सांडावे मांडावे / काय ऐसे नाही ठावे //
तुका म्हणे करी / ताक दुधा एकीसरी //
संत तुकाराम
काही मूर्ख लोक फक्त तो दुसऱ्या जातीचा आहे म्हणून त्यावर विनाकारण टीका करण्यात धन्यता मानतात.
अशा मूर्ख लोकांना कोणत्या लिखाणावर टीका करायची आणि कोणत्या लिखाणाची स्तुती करायची हेही माहीत नसते.
जसे, हागणदारीतून जातांना नाक दाबायचे असते.कारण, तो घाणेरडा वास नाकावाटे आपल्या शरीरात जाऊ नये. पण हे मूर्ख लोक जेवताना ही नाक दाबतात आणि मूर्ख असल्याचा जगाला पुरावा देतात.असे करतांना ते एक गोष्ट विसरतात की यात त्यांचीच फजीती होते.कोणती गोष्ट साहित्यातून घ्यायची आणि कोणती टाकायची हे त्या मूर्खाना माहितीच नसते.
हे मूर्ख लोक हागणदारीत कुणी आपला बसला असेल तर त्याचा वास घ्यायलाही मागेपुढे पाहत नाही.आणि परक्याने दिलेल्या पंच पकवानालाही नाक दाबून घाण समजतील. यातूनच त्यांची जातिवादी मानसिकता स्पष्टपणे दिसते.
अशा मूर्ख लोकांना दुधातला आणि ताकातला फरकच समजत नाहीत. हे मूर्ख लोक परक्याने दिलेले ताजे तवाने दूध ही पीनार नाहीत पण आपल्याने दिलेले आंबट ताक ही घटा घटा पितील.
*संजय बनसोडे*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा