मी बाबासाहेब.
माझ्या समाजावर माझ्या इभ्रतीवर नितांत प्रेम करणारा,
मी बाबासाहेब.
माझा समाज मला सूटा बूटात बघायचा होता,
तो मी बघतोय.
माझा समाज मला नोकरशाहीत बघायचा होता,
तोही मी बघतोय.
पण माझा समाज माझ्या समाजात दिसत नाही तर तो समाजाचा घातच करताना दिसतो.
मी कधीच नाही सांगितले,
माझे पुतळे उभारायला.
मी कधीच नाही सांगितले,
माझे दैवतीकरण करायला.
आज मला माझ्या काही आंधळ्या समाजातील लोकांनी देव बनवले.माझे दगडाचे पुतळेही असंख्य झाले.
पण माझे विचार ?
विचार मात्र मेले.
माझ्या विचारप्रवाहाच्या नदीला अडवून बांध न बांधता माझ्या विचारप्रवाहाचे पाणी माझ्या समाजाने सरळ ब्राम्हणवादाच्या विशाल समुद्रात सोडले आणि नाहीसे केले.
जर माझ्या विचारप्रवाहाच्या नदीला अडवून त्याचे मोठे धरन बांधले असते तर आज माझा समाज त्या धरनाभोवती सुजलाम सुफलाम बनला असता.
स्वतःच्या स्वार्थासाठी आणि फायद्यासाठी माझा विचारप्रवाह धूळीस मिळवण्यात सर्वात जास्त दोषी मी माझ्या जातींतील पुढाऱ्यालाच समजतो.
एका लाकडाच्या काडीला कुणीही तोडू शकते कारण ती मोळीच्या बाहेर असते पण शंभर काड्याच्या मोळीला तोडायचा विचारही कुणाच्या मनाला सिवणार नाही.
मी माझ्या समाजाला कालही हेच सांगित होतो आणि आजही हेच सांगिन, संघटित व्हा !
पण संघटित न होता दिवसेंदिवस माझा समाज विभागित चालला आहे.
तुमचा उद्धार करण्यासाठी कुणी देव येणार नाही तर तुमचा उद्धार तुम्हांलाच करावा लागेल.हे माझे बोल तुम्हां माहीत असतील तर आजही तुम्ही का दुसऱ्यावर अवलंबून राहता. का स्वयंप्रकाशित होत नाही पुढाऱ्यावरच का अजूनही अवलंबून राहता. तो पैशाच्या लालचीने तुमचा रोज सौदा करतो.तुम्ही मात्र मूंग गिळून गप्प !
अरे मारा असल्या पुढाऱ्याला लाथ आणि व्हा स्वतः पुढे,मला माझ्या समाजात बांडगूळ नाही पाहिजे तर मला माझ्या समाजात हरेक व्यक्ती समाजासाठी झटणारा पुढारी हवा आहे. जागोजागी पक्ष खोलून त्याला जनावराचे नाव देण्यापेक्षा निस्वार्थपणाने समाजातल्या माणसासाठी एक व्हा !
इथून पुढे मला या समाजात आंबेडकर बघायचे आहेत दुसऱ्याच्या इशाऱ्यावर चालणारे माकडे नाही.
माझ्या समाजावर माझ्या इभ्रतीवर नितांत प्रेम करणारा,
मी बाबासाहेब.
माझा समाज मला सूटा बूटात बघायचा होता,
तो मी बघतोय.
माझा समाज मला नोकरशाहीत बघायचा होता,
तोही मी बघतोय.
पण माझा समाज माझ्या समाजात दिसत नाही तर तो समाजाचा घातच करताना दिसतो.
मी कधीच नाही सांगितले,
माझे पुतळे उभारायला.
मी कधीच नाही सांगितले,
माझे दैवतीकरण करायला.
आज मला माझ्या काही आंधळ्या समाजातील लोकांनी देव बनवले.माझे दगडाचे पुतळेही असंख्य झाले.
पण माझे विचार ?
विचार मात्र मेले.
माझ्या विचारप्रवाहाच्या नदीला अडवून बांध न बांधता माझ्या विचारप्रवाहाचे पाणी माझ्या समाजाने सरळ ब्राम्हणवादाच्या विशाल समुद्रात सोडले आणि नाहीसे केले.
जर माझ्या विचारप्रवाहाच्या नदीला अडवून त्याचे मोठे धरन बांधले असते तर आज माझा समाज त्या धरनाभोवती सुजलाम सुफलाम बनला असता.
स्वतःच्या स्वार्थासाठी आणि फायद्यासाठी माझा विचारप्रवाह धूळीस मिळवण्यात सर्वात जास्त दोषी मी माझ्या जातींतील पुढाऱ्यालाच समजतो.
एका लाकडाच्या काडीला कुणीही तोडू शकते कारण ती मोळीच्या बाहेर असते पण शंभर काड्याच्या मोळीला तोडायचा विचारही कुणाच्या मनाला सिवणार नाही.
मी माझ्या समाजाला कालही हेच सांगित होतो आणि आजही हेच सांगिन, संघटित व्हा !
पण संघटित न होता दिवसेंदिवस माझा समाज विभागित चालला आहे.
तुमचा उद्धार करण्यासाठी कुणी देव येणार नाही तर तुमचा उद्धार तुम्हांलाच करावा लागेल.हे माझे बोल तुम्हां माहीत असतील तर आजही तुम्ही का दुसऱ्यावर अवलंबून राहता. का स्वयंप्रकाशित होत नाही पुढाऱ्यावरच का अजूनही अवलंबून राहता. तो पैशाच्या लालचीने तुमचा रोज सौदा करतो.तुम्ही मात्र मूंग गिळून गप्प !
अरे मारा असल्या पुढाऱ्याला लाथ आणि व्हा स्वतः पुढे,मला माझ्या समाजात बांडगूळ नाही पाहिजे तर मला माझ्या समाजात हरेक व्यक्ती समाजासाठी झटणारा पुढारी हवा आहे. जागोजागी पक्ष खोलून त्याला जनावराचे नाव देण्यापेक्षा निस्वार्थपणाने समाजातल्या माणसासाठी एक व्हा !
इथून पुढे मला या समाजात आंबेडकर बघायचे आहेत दुसऱ्याच्या इशाऱ्यावर चालणारे माकडे नाही.
-संजय बनसोडे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा