१)
कोपर्डी प्रकरणा संदर्भात मराठा संघटनांना दलित नेत्यांची ऍलर्जी का ?
कोपर्डी प्रकरणा संदर्भात मराठा संघटनांना दलित नेत्यांची ऍलर्जी का ?
रविवारी नेरुळ मधे अल्पवयीन स्वप्नील सोणावणे याची काही जातिवादी वृत्तीच्या लोकांनी हत्या केली त्याच्या विरोधात सर्व धर्मीय निषेध सभा आयोजीत केली होती. ज्या आगरी समाजातील काही जातीवाद्याने स्वप्नीलला त्याच्या आई वडिला समोर जिवे मारले, त्याच आगरी समाजातील कार्यकर्ते आज पीड़ित कुटुंबाच्या दुखात सहभागी होऊन दोषी विरोधात ताबडतोब कार्यवाही करण्याची मागणी करीत होते.डॉ बाबासाहेब आंबेडकरांची जी जाती अंताची लढाई होती तिचे सर्वच समाजातील पुरोगामी विचारवंत स्वागत करतात.
आगरी समाज,मराठा समाज बौद्ध समाज साऱ्यांनी स्वप्नीलला रविवारी श्रध्दांजली वाहली.
आगरी समाज,मराठा समाज बौद्ध समाज साऱ्यांनी स्वप्नीलला रविवारी श्रध्दांजली वाहली.
कुठेही घडलेल्या दलित अत्याचार प्रकरणी भेट देण्यासाठी येणाऱ्या कुठल्याच जाती धर्मातील नेत्यांना, कार्यकर्त्यांना अडविण्यात येत नाही. कोपर्डी बलात्कार विरोधात सारेच दलित कार्यकर्ते पेटून उठले. सर्वच क्षेत्रातून कोपर्डीत घडलेल्या,माणुसकीला काळिमा फासणाऱ्या बलात्काराचा निषेध होत आहे. असे असतांना सुद्धा तिथे काही संघटने तर्फे मराठा समाजात दलितांविरोधात द्वेष पसरवण्याचे कारस्थान होत आहे. म्हणूनच काही मराठा संघटना पीड़ित कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी येणाऱ्या दलित नेत्यांना अडवित आहेत. ऍट्रॉसिटी सारखे कायदे बंद करण्याची मागणी करीत आहेत.
२)
स्वप्नील च्या आई वडिलांची मागणीही हे सरकार पूर्ण करील का ?
२)
स्वप्नील च्या आई वडिलांची मागणीही हे सरकार पूर्ण करील का ?
कोपर्डी येथे भेट देऊन माननीय मुख्यमंत्री साहेबांनी मराठा संघटनाच्या सर्वच मागण्या पूर्ण केल्या आहेत. पीड़ित कुटुंबाच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा आहे. आरोपीला फाशी होईपर्यंत मी जातीने लक्ष देईल. आम्ही तुमच्या आलेल्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. हा खटला जलतगती न्यायालयात सुरू करून जेष्ठ विधिज्ञ अँड. उज्वल निकम काम पाहणार आहेत.महिन्याच्या आत आरोपी विरुद्ध दोषापत्र न्यायालयात सादर होईल.खरच हे मुख्यमंत्री साहेबांचे विधान स्वागत करण्याजोगेच आहे.
पीड़ित कुटुंबाची जात पात न बघता दलित बलात्कार प्रकरणीही हिच भूमिका सरकारने घेतली असती तर महाराष्ट्रात आज बलात्कारांचे प्रमाण झिरो असते आणि कोपर्डी सारखे अमानुष प्रकरण घडलेच नसते. कोपर्डीत घडलेली घटना अत्यंत वाईट आहे याबद्दल कुणाचेच दुमत नाही.आणि तितकीच दुर्दैवी घटना नेरुळ येथीलही आहे. तिथेही पीड़ित कुटुंब स्वप्नीलचा हत्येचा खटला हा जलतगती न्यायालयात सुरू करून आरोपीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करीत आहे.
त्यांचेही म्हणणे ऐकून सरकार लवकरात लवकर दोषीना सजा देईल काय ? का येथेही स्वप्नीलची जात आडवी येईल !
त्यांचेही म्हणणे ऐकून सरकार लवकरात लवकर दोषीना सजा देईल काय ? का येथेही स्वप्नीलची जात आडवी येईल !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा