आमचा खापर पणजोबा देवाचा लय मोठा भक्त त्यामुळे आमच्या घरात दैविक वारसा लाभला. दरवर्षी देवाच्या वाऱ्या करायच्या देवाला नवस बोलायचे त्यांच्या भेटीला पायी पायी शेकडो अंतर कापत जाऊन त्यांच दर्शन घ्यायच. त्याचे कारणही तसेच होते, तेंव्हा शिक्षण म्हणजे काय हे दूरदूर पर्यंत माहित नव्हते त्या काळात तर विज्ञानाने भारत मातेच्या पोटात प्रवेश ही केला नव्हता. त्यामुळे माझ्या खापर पणजोबाला वाटायचे की, हे जे घडतंय, दिवस, रात्र, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे सारे आमचा देवच आमच्यासाठी घडवतय, तोच आम्हांला प्यायला पाणी खायाला अन्न श्वास घ्यायला हवा देतो, तोच आमची जडण घडण करतो तोच आम्हांला आयुष्यभर सुखी ठेवतो.
जर तो आपल्यासाठी येवढे करीत असेल तर आपणही त्यासाठी त्याचा आशीर्वाद घेण्यासाठी त्यांची पूजा अर्चना करावी सर्व मिळून त्याच्या भेटीला जावं, त्याला खुश ठेवावं. खापर पणजोबानी आयुष्यभर वाऱ्या केल्या देव देव केला शेवटी म्हातारे होऊन देवा घरी गेले. त्यांची जागा माझ्या आजोबांनी घेतली, देश स्वतंत्र झाला खेड्यापाड्यात शिक्षणाची सुरवात झाली. नवीन पिढी शिकत होती विज्ञान समजत होती पण घरात दैववादी वारसा असल्यामुळे खरे विज्ञान विसरून हे पण त्या विधात्याच्या आशीर्वादानेच होत आहे समजून पुढे पुढे शिक्षण घेत होती. खापर पणजोबा आणि आजोबा फक्त देवांवर आणि दैवी शक्तींवर अवलंबून होता. नुकसान झाले तर नशिबातच नव्हते फायदा झाला तर देवांनीच केला. पण वडील शिक्षण शिकूनही देव देव करीत होते, नशिबाला दोष देत होते,विज्ञान शिकूनही विज्ञानाला समजत नव्हते. शिक्षण शिकून नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून प्रगती करीत होते आणी आम्हां सांगत होते हे सारे देवाच्या आशीर्वादानेच आपल्या नशीबी आले.
तेंव्हा मला कळत नव्हतं की खरा अज्ञानी कोण ?
माझा खापर पणजोबा व आजोबा का सर्व शिक्षण घेऊन अंधश्रद्धा जोपासणारा माझा बाबा ?
मनोगत . . . . . . . . . .
जर तो आपल्यासाठी येवढे करीत असेल तर आपणही त्यासाठी त्याचा आशीर्वाद घेण्यासाठी त्यांची पूजा अर्चना करावी सर्व मिळून त्याच्या भेटीला जावं, त्याला खुश ठेवावं. खापर पणजोबानी आयुष्यभर वाऱ्या केल्या देव देव केला शेवटी म्हातारे होऊन देवा घरी गेले. त्यांची जागा माझ्या आजोबांनी घेतली, देश स्वतंत्र झाला खेड्यापाड्यात शिक्षणाची सुरवात झाली. नवीन पिढी शिकत होती विज्ञान समजत होती पण घरात दैववादी वारसा असल्यामुळे खरे विज्ञान विसरून हे पण त्या विधात्याच्या आशीर्वादानेच होत आहे समजून पुढे पुढे शिक्षण घेत होती. खापर पणजोबा आणि आजोबा फक्त देवांवर आणि दैवी शक्तींवर अवलंबून होता. नुकसान झाले तर नशिबातच नव्हते फायदा झाला तर देवांनीच केला. पण वडील शिक्षण शिकूनही देव देव करीत होते, नशिबाला दोष देत होते,विज्ञान शिकूनही विज्ञानाला समजत नव्हते. शिक्षण शिकून नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून प्रगती करीत होते आणी आम्हां सांगत होते हे सारे देवाच्या आशीर्वादानेच आपल्या नशीबी आले.
तेंव्हा मला कळत नव्हतं की खरा अज्ञानी कोण ?
माझा खापर पणजोबा व आजोबा का सर्व शिक्षण घेऊन अंधश्रद्धा जोपासणारा माझा बाबा ?
मनोगत . . . . . . . . . .
संजय बनसोडे
नवी मुम्बई
नवी मुम्बई
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा